रायगड
मुंबई | प्रतिनिधी
बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नावे सुचवा, असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं आहे. एच.के. पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती अॅपद्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. दोन दिवस मंथन केल्यानंतर आता डिजिटल मत घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी नुकतंच महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी खलबतं केली. आता एच.के. पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती अॅपद्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. महाराष्ट्रात 557 प्रदेश प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे.