। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील करोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. गेल्या 24 तासांत देशात 1 लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.